India Morning News
मुंबई – एअर इंडियाने आज एकूण ८ उड्डाणं रद्द केली असून, यामध्ये ४ आंतरराष्ट्रीय विमानांचाही समावेश आहे. ही विमानं चेन्नई, दिल्ली, दुबई, मेलबर्न, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद आणि मुंबई येथून उड्डाण करणार होती.
विमानांची तांत्रिक तपासणी, खराब हवामान आणि काही हवाई क्षेत्रांवरील निर्बंध लक्षात घेता ही उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत, अशी माहिती एअर इंडियाने निवेदनात दिली आहे.
रद्द करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये दुबई-चेन्नई (AI906), दिल्ली-मेलबर्न (AI308), मेलबर्न-दिल्ली (AI309) आणि दुबई-हैदराबाद या उड्डाणांचा समावेश आहे. तर देशांतर्गत पुणे-दिल्ली, अहमदाबाद-दिल्ली, हैदराबाद-मुंबई आणि चेन्नई-मुंबई ही उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत.
या अचानक झालेल्या बदलामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून, एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे. कंपनीने स्पष्ट केलं आहे की, प्रभावित प्रवाशांना संपूर्ण परतावा दिला जाईल आणि पर्यायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच, कर्मचारी प्रवाशांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सज्ज असल्याचंही सांगण्यात आलं आहे.






Comments are closed