India Morning News
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमार यांचा विशेष मुलाखत घेतली. या संवादादरम्यान अक्षय कुमारने केवळ राजकीय किंवा आर्थिक विषयांवर लक्ष दिले नाही, तर पोलिस दलाशी संबंधित एका महत्त्वाच्या गोष्टीकडेही लक्ष वेधले.
अक्षय कुमारने महाराष्ट्र पोलिसांच्या बुटांबाबत चिंता व्यक्त केली. त्यानुसार, पोलीस बूटांमध्ये हिल्स (टाचे) असल्यामुळे धावणे कठीण होते आणि तातडीच्या परिस्थितीत अडथळा निर्माण होतो. “मी स्वतःही खेळाडू असल्याने सांगतो की योग्य बूट असल्यास पोलीस अधिक जलद आणि सुरक्षितपणे काम करू शकतील,” असे अक्षय कुमार यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांचे मत-
या सूचना ऐकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिला. “खरंच, ही एक चांगली सूचना आहे. पोलीस हे बूट घालूनच काम करतात, पण याची दखल कुणी घेतली नाही,” असे फडणवीस यांनी सांगितले.
यानंतर त्यांनी अक्षय कुमार यांना बूट डिझाइनसाठी सल्ला देण्याची संधी दिली. “तुम्ही काही कल्पना सुचवली तर आम्ही ती लागू करू. तुम्ही अॅक्शन हिरो आहात, त्यामुळे बूट कसे असावे हे तुम्हाला चांगले माहीत असेल. तुमचे विचार आम्ही नक्कीच घेऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांच्या कार्यक्षमतेत वाढ-
मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर, महाराष्ट्र पोलिसांच्या बुटांमध्ये लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. नवीन, आरामदायक आणि तंत्रज्ञानानुसार डिझाइन केलेले बूट पोलीसांना धावण्यात, गुन्हेगारांचा पाठलाग करण्यात आणि तातडीच्या परिस्थितीत आपले कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यात मदत करतील. यामुळे केवळ पाय आणि पाठ यांच्यावर होणारा ताण कमी होणार नाही, तर पोलिसांची एकूण कामगिरीही सुधारली जाईल.











Comments are closed