Shopping cart

  • Home
  • Pune
  • भाजपची रणनीती; तिकिटे सर्वेक्षणावर अन् जनतेच्या विश्वासावरच दिले जाणार,महसूल मंत्री बावनकुळेंची घोषणा

भाजपची रणनीती; तिकिटे सर्वेक्षणावर अन् जनतेच्या विश्वासावरच दिले जाणार,महसूल मंत्री बावनकुळेंची घोषणा

November 13, 20250 Mins Read
Chandrashekhar Bawankule New Districts in Maharashtra
235

India Morning News

Share News:
Share

पुणे :राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. पक्षाने राज्यभर अंतर्गत सर्वेक्षण मोहीम सुरू केली असून, उमेदवार निवडताना हेच सर्वेक्षण निर्णायक ठरणार आहे. “तिकिटे देताना जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची प्रतिमा आणि सर्वेक्षणाचा निकाल — या तिन्ही गोष्टींचा विचार केला जाईल,” अशी स्पष्ट भूमिका राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.

बावनकुळे यांनी बुधवारी पुण्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,“भाजपकडे अनेक इच्छुक कार्यकर्ते आहेत, पण तिकिट फक्त त्या व्यक्तीलाच दिले जाईल ज्याच्यावर जनता समाधानी आहे आणि ज्याने प्रत्यक्ष जनतेसाठी काम केले आहे. सर्वेक्षणात जनतेचा प्रतिसाद महत्त्वाचा घटक असेल.”

ते पुढे म्हणाले, “भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शिंदे गट) या महायुतीला स्थानिक निवडणुकांमध्ये ५१ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे. सोमवारी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना मंत्री उदय सामंत आणि शंभूराजे देसाई यांच्यासोबत समन्वय समितीची बैठक घेतली. प्रत्येक मतदारसंघात वास्तव सर्वेक्षणाद्वारे उमेदवारांची निवड होईल.”

भाजपच्या या नव्या धोरणामुळे पक्षात शिस्तबद्ध आणि जनतेकेंद्री निवडणूक लढवण्याचा संदेश दिला जात असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ही रणनीती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share