India Morning News
कन्हान औद्योगिक क्षेत्र पीड़ित शेतकऱ्यांची समाधान शिबीरात एसडीओ ला मागणी.
कन्हान : – औद्योगिक विकासाच्या नावावर शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अग्रिम मोबदला देऊन त्या जमीनीचा अवार्ड पास न करता तसेच कुठलाही फेरफार न करता परस्पर शेतकऱ्यांच्या ७/१२वर औद्योगिक विकास महामंडळाचे नाव दर्ज केल्याने शेतकरी भुमिहिन होऊ न बेरोजगार झाला . तसेच ५३ वर्षात कुठलाही उद्योग सुरू न केल्याने १५ दिवसात ७/१२ शेतक-यांचे नावे फेरफार करा . अन्यथा आपल्या कार्यालया सामोर उपोषण करण्याची परवानगी द्या. अशी मागणी एसडीओ रामटेक यांना निवेदन देऊन पिडीत शेतकऱ्यांनी केली आहे .
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नागपुर यानी १९७२ मध्ये टेकाड़ी आणि कांद्री च्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनी औद्योगिक विकासाकरिता जमीनीचा ८० टक्के अग्रिम मोबदला देऊन त्या जमीनीचा अवार्ड पास न करता तसेच कुठलाही फेरफार न करता परस्पर शेतकऱ्यांच्या ७/१२ वर औद्योगिक विकास महामंडळाचे नाव दर्ज केल्याने शेतकरी भुमिहिन होऊन बेरोजगार झाला . या सातबारा सर्वे नं. ४९३ जमिनीवर ५३ वर्षांत एकही उद्योग उभारला नाही . यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी तहसीलदार पारशिवनी , एसडीओ रामटेक , जिल्हाधिकारी नागपुर आणि संबधित कार्यालयास पत्र देऊन ७/१२ वर चुकीने फेरफार केल्याने आम्हाला शेतजमिन परत द्या किंवा योग्य मोहबदला देऊन न्याय देण्याची मागणी करून सुध्दा न्याय न मिळाल्याने ग्राम पंचायत टेकाडी येथील समाधान शिबीरात मा.प्रियेश महाजन उपविभागीय अधिकारी रामटेक (एसडीओ) व मा.सुभाष वाघचौरे तहसीलदार पारशिवनी यांना निवेदन देऊन १५ दिवसात ७/१२ पिडीत शेतकऱ्यांच्या नावे फेरफार करा. अन्यथा आपल्या उपविभागीय कार्यालय रामटेक सामोर परिवारासह उपोषण करण्याची परवानगी द्या . अशी मागणी कन्हान औद्योगिक क्षेत्र पिडीत शेतकरी वामन जगंलु कोल्हे ,चंद्रभान जगंलु बर्वे , शिवशंकर राऊत , रविशंकर यादोवराव राऊत , अशोक भदुजी हुड , प्रविण अशोक हुड यांनी केली आहे .









Comments are closed