Shopping cart

  • Home
  • Politics
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पदवीधर मतदारसंघासाठी भरला अर्ज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पदवीधर मतदारसंघासाठी भरला अर्ज

October 22, 20251 Mins Read
CM Devendra Fadnavis
82

India Morning News

Share News:
Share

नागपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समीप आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सज्जता दाखवली असून, पक्षाने यासाठी तब्बल सात लाख मतदारांची नोंदणी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

ही मोहीम व्यापक पातळीवर राबविण्यासाठी पक्षाने जिल्हानिहाय जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी कार्यकर्त्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने नेतृत्वाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः अर्ज भरून या मोहिमेला गती दिली आहे. त्यांच्या पुढाकारानंतर कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाची लाट पसरली आहे.

दिवाळी संपल्यानंतर मतदार नोंदणीला प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश पक्ष नेतृत्वाकडून सर्व विभागांना देण्यात आले आहेत. मागील निवडणुकीत झालेल्या अपयशानंतर भाजपने या वेळेस संपूर्ण नियोजनबद्ध तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मोहिमेसाठी माजी आमदार सुधाकर कोहळे यांची मतदार नोंदणी प्रमुख म्हणून, तर सुधीर दिवे यांची सहप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कोहळे यांनी सांगितले की, “या वेळेस सात लाख मतदारांची नोंदणी पूर्ण करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असून, प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करण्याची गरज आहे.”

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवारी इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त मतदार अर्ज संकलित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र काही पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी तत्काळ पुनर्रचना करण्याचे संकेत दिले आहेत.

अलीकडेच नागपुरात झालेल्या विदर्भस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पदवीधर मतदार नोंदणीच्या गतीबाबत तपासणी केली. त्यानंतर शहरात आगमन झाल्यावर त्यांनी स्वतः अर्ज सादर करून या मोहिमेला औपचारिक सुरुवात केली.

या कार्यक्रमाला सुधाकर कोहळे, सुधीर दिवे, दयाशंकर तिवारी, गिरीश देशमुख, श्रीकांत आगलावे, नरेंद्र बोरकर, विष्णू चांगदे आणि रितेश गावंडे हे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “ही केवळ नोंदणी मोहीम नाही, तर पक्ष संघटन मजबूत करण्याची संधी आहे. तरुण पदवीधरांपर्यंत पोहोचून त्यांचा विश्वास जिंकणे हेच आपल्या प्रयत्नांचे खरे यश ठरेल.या उपक्रमातून भाजपने आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आपली संघटनात्मक शक्ती पुन्हा सिद्ध करण्याची प्रक्रिया सुरु केल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share