Shopping cart

  • Home
  • Politics
  • मुंबई विमानतळाच्या नावावरून वाद; मोदी-अदानी प्रयत्नात, राऊतांचा आरोप

मुंबई विमानतळाच्या नावावरून वाद; मोदी-अदानी प्रयत्नात, राऊतांचा आरोप

October 9, 20250 Mins Read
नवी मुंबई विमानतळ उद्घाटनावरून राजकीय वाद
120

India Morning News

Share News:
Share

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काल थाटात उद्घाटन झाले, मात्र त्याच्या नावावरून राजकीय वाद पेटला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी असा गंभीर दावा केला की, या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यासाठी भाजप आणि गौतम अदानी प्रयत्न करत आहेत.

शिवसेनेने भूमिपुत्रांचे नेते दि. बा. पाटील यांच्या नावाला मान्यता देण्याची मागणी केली होती, मात्र उद्घाटनाच्या वेळी हे नाव घोषित झाले नाही. राऊत म्हणाले की, “भाजप आणि अदानी या नावाला विरोध करत आहेत. चर्चा अशी आहे की, विमानतळाचे नाव ‘अदानी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ किंवा ‘नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ ठेवण्याची योजना आहे.”

राऊत यांनी व्यंगात्मक भाषेत पंतप्रधानांवर टीका करत म्हटले, “मोदी अजरामर आहेत, ते विष्णूचे १३वे अवतार आहेत, त्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला देण्याची गरज नाही.

यासोबतच राऊतांनी मोदींच्या प्रसिद्धी मोहिमेवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “मुंबईत जागोजागी मोदींचे पोस्टर्स लावले जात आहेत. भाजपकडे आणि सरकारकडे मोदींच्या जाहिरातींसाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही. वर्ल्ड बँकेतून कर्ज घेतात, पण जनतेसाठी निधी देत नाहीत.”

राऊत यांनी स्पष्ट केले की, “विमानतळाच्या प्रकल्पाची सुरुवात पूर्वीच्या सरकारने केली होती; मोदींनी केवळ फित कापण्याचे काम केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील एक महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प असून, भविष्यात तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रवासी केंद्र म्हणून ओळखला जाईल.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share