India Morning News
येरखेडा — नगराध्यक्ष पदाचे लोकप्रिय उमेदवार राजकिरण शिवराम बर्वे यांनी निवडणुकीत दाखवलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल नागरिकांसह भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे आणि स्थानिक नेतेमंडळींचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
निवडणुकीच्या काळात जनसंपर्क, प्रचार मोहीम, घराघरातील भेटी आणि सभांमध्ये मिळालेला अपार प्रतिसाद पाहता बर्वे भावूक झाल्याचे दिसून आले. “प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या माझ्यासाठी कष्ट केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या येरखेडा ग्रामस्थांचा मी मनापासून ऋणी आहे,” असे ते म्हणाले.
बर्वेंच्या वक्तव्यात कृतज्ञतेसोबतच विकासाचा दृढ संकल्पही जाणवला. “आपल्या सहकार्याच्या जोरावरच येरखेड्याला आदर्श नगरपंचायत बनवण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची निष्ठा हे माझे खरे भांडवल आहे,” असे बर्वे यांनी सांगितले.
येरखेड्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेले असताना बर्वेंचे हे संयत, सौम्य आणि कृतज्ञतेने भरलेले वक्तव्य विशेष चर्चेत आहे. स्थानिक नागरिकांतही त्यांच्या या भावनिक संदेशाची सकारात्मक दखल घेतली जात आहे.





