Shopping cart

  • Home
  • Politics
  • दिवाळीनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप; राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीची चर्चा जोरात

दिवाळीनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप; राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीची चर्चा जोरात

October 23, 20251 Mins Read
rife about Raj and Uddhav Thackeray meeting
101

India Morning News

Share News:
Share

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरें पुन्हा एकत्र येणार आहेत. गेल्या ३-४ महिन्यांत दोन्ही बंधूंनी सात ते आठ वेळा भेट घेऊन सुसंवाद वाढवला आहे.

दोन दशकांहून अधिक काळ एकमेकांशी दूर असलेल्या ठाकरे बंधूंच्या या नव्या भेटीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना नवीन दिशा मिळत आहे. राज ठाकरे जर उद्धव ठाकरेंच्या युतीसोबत उभे राहिले, तर महाविकास आघाडीला नवीन सामर्थ्य प्राप्त होईल, अशी चर्चा सुरू आहे.

परंतु, राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील संभाव्य समावेशावर काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध व्यक्त केला आहे. विशेषतः वर्षा गायकवाड आणि भाई जगताप यांनी या युतीला विरोध दर्शवला आहे. मनसेकडून काँग्रेसवर टीका होत असून, उद्धव ठाकरेंच्या पक्षाने या विरोधाला फार महत्व दिलेले नाही.

सध्या राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटी नियमित होत आहेत. चार दिवसांपूर्वी राज ठाकरेसह कुटुंब शिवतीर्थावर गेले होते, तर त्यानंतर उद्धव ठाकरें मातोश्रीवरून थेट राज ठाकरेच्या निवासस्थानी भेटीस गेले. गेल्या तीन महिन्यात तब्बल ९ वेळा ठाकरे बंधूंनी भेट घेतली आहे.

राजकीय विश्लेषकांचा अंदाज असा आहे की, दिवाळीनंतर ठाकरे बंधू मोठा निर्णय जाहीर करणार आहेत. मराठी वर्चस्व आणि स्थानिक राजकारणाच्या मुद्द्यांवर आधारित ही युती भविष्यातील निवडणुकीच्या रणनितीत मोठा बदल घडवून आणू शकते.

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share