India Morning News
माजी गटनेते राजेंद्र शेंदरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार सुभाष वाघचौरे यांना निवेदन
कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील संजय गांधी , श्रावण बाळ निराधार योजनेचे अनेक लाभार्थी मागील सहा महिन्यापासुन वंचित असल्याने त्यांचे उर्वरित अनुदान त्यांच्या बँक खात्यात पाठवुन हे अनुदान नियमित देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी कन्हान – पिपरी नगर परिषद माजी गटनेते राजेंद्र शेंदरे यांच्या नेतृत्वात पारशिवनी तहसिलदार सुभाष वाघचौर याना निवेदन देऊन केली आहे.
निवेदन पत्रात सांगितले आहे कि संजय गांधी , श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अनेक दिवसापासुन अनुदान देण्यात आले नाही . त्यामुळे निराधारांच्या अडचणित दिवसेदिवस वाढ होत आहे . शासना कडुन अनुदान देण्यात येते . परंतु गेल्या सहा महिन्यापासुन पारशिवनी तालुक्यातील संजय गांधी , श्रावण बाळ निराधार योजनेच्या अनेक लाभार्थी नागरिक या योजने पासुन वंचित आहेत . विधवा , अपंग , वयोवृद्ध , निराधार व्यक्तींना बँक खात्यात १५०० रुपए देवुन त्यांना मदतीचे शासनाचे धोरण योग्य आहे . परंतु तहसील कार्यालयात निराधार व्यक्तींना आधारकार्ड आणि बँक पासबुक , मोबाईल ओटीपी सांगा असे सांगुन वारंवार पारशिवनी तहसिलच्या चकरा मारून सुद्धा निराधार व्यक्तींच्या बँक खात्यात अनुदान जमा होत नसल्याचे जानवत आहे . तसेच आधार केंद्र काही दिवसापासुन बंद असल्यामुळे हया निराधार लाकांचे आधार कार्ड अपडेट होत नसल्याने ते सर्व या योजने पासुन वंचित आहेत . बहुतांश सर्व निराधार व्यक्तींनी आधारकार्ड आणि बँक पासबुक मोबाईल ओटीपी देवुन पारशिवनी तहसील कार्यालयाची प्रक्रिया पुर्ण केलेली आहे . तरी सुद्धा त्यांच्या खात्यात अजुनही सात महिने किंवा आठ महिने झालेले आहे तरी सुद्धा त्यांच्या खात्यात एका महिण्याचे पैशे आलेले आहे व सहा किंवा सात महिण्याचे पैसे त्यांच्या खात्यात अजुनही आलेले नाही . निराधार योजनेचे उर्वरीत अनुदान ज्या व्यक्तींच्या खातात अनुदान रक्कम आलेले नाहीत त्या निराधार गरजु व्यक्तींना लवकरात लवकर पाठवुन लाभ देण्यात यावे , अशी मागणी नागरिकांनी माजी गटनेते राजेंद्र शेंदरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार सुभाष वाघचौरे यांना निवेदन देऊन केली आहे .
या प्रसंगी डॉ. राजेश ठाकरे , अतुल हजारे , राहुल मेंगर , शैलेश शेळके , प्रकाश वांढे , अशोक कुथे , आशिष दिवटे , माजी नगरसेविका संगिता खोब्रागडे , अनिता पाटिल , वंदना कुरडकर , सुनंदा दिवटे , सागर सायरे , मनोज कुरडकर , निलकंठ मस्के , डॉ. प्रमोद भड , नंदलाल बावनकुळे , संजय रंगारी , चिंटु वाकुडकर , आंनद शर्मा , दिपंकर गजभिये , प्रकाश कांबळे , दिवाकर भोयर , सतीश वाड़ीभस्मे , नितेश वासनिक सह आदि नागरिक उपस्थित होते .








Comments are closed