India Morning News
91 लाख 65 हजार ,शेतकऱ्यांना मिळाले 1892.61 कोटी रुपये
मुंबई:- राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेल्या नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेअंतर्गत सातवी हप्ते आज वितरित करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित कार्यक्रमात 91,65,156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1892.61 कोटी रुपये थेट ऑनलाइन हस्तांतरण केले. ही मदत शेतकऱ्यांच्या शेतीतील खर्चासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राबवली जाते.
या योजनेअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये अतिरिक्त आर्थिक सहाय्य देते. त्यामुळे जी शेतकरी दोन्ही योजनेस पात्र आहे, त्याला दरवर्षी एकूण 12,000 रुपये लाभ मिळतो. सातव्या हप्त्यात शेतकऱ्यांना एप्रिल ते जुलै 2025 या कालावधीसाठी अनुदान दिले गेले. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, कृषि मंत्री दत्तात्रेय भराणे आणि इतर कॅबिनेट सदस्य उपस्थित होते.
कृषि मंत्री दत्तात्रेय भराणे म्हणाले की, ही योजना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीसंबंधी खर्च पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आतापर्यंत 93,09,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 11,130 कोटी रुपये सहा हप्त्यांद्वारे जमा झाले आहेत. सातवी हप्ते वितरित झाल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या अजून वाढेल आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. विशेषतः सध्या राज्यात सुरु असलेल्या जास्त पावसामुळे ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.










Comments are closed